'चुकीला माफी नाही', बीडच्या कार्यक्रमात अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज (गुरुवार, 29 ऑगस्ट) बीडमध्ये पोहोचली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर इशारा दिला.

Advertisement
Read Time: 3 mins
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज (गुरुवार, 29 ऑगस्ट) बीडमध्ये पोहोचली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख त्यांनी या भाषणात केला. 'लाडकी बहीण' योजनेबाबत विरोधक अफवा पसरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर मालवणमधील राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणातही त्यांनी गंभीर इशारा दिला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एक रुपयाही काढून घेतला जाणार नाही.

'केंद्रातून निधी कसा आणायचा हे आम्हाला माहीत आहे.विरोधक कोर्टात जाऊन योजना कशा बंद करता येतील हे पाहत आहेत.लाडकी बहीण योजनेतून तळागाळातील महिलांना मदत केली.काहीजण आमची बदनामी करत आहेत.पण हा अजित दादांचा वादा आहे मी माझ्या बहिणींना कधी फसवणार नाही तुम्ही मला राखी बांधलेली आहे लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी ओवाळणी आहे. सरकार खात्यातून पैसे काढून घेणार असे विरोधक अफवा पसरवत आहेत मात्र कोणाचाही एक रुपयाही काढून घेतला जाणार नाही,' असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

राज्यातील 52 लाख कुटुंबाना 3 गॅस सिलिंडर मोफत देणार याचे पैसे थेट महिलांच्या खात्यात येणार आहेत.गरिबांना गरिबीतून बाहेर काढण्याकरता ही योजना आहे.आम्ही मुलीचे शिक्षण ही मोफत करणार आहोत. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या श्रीमंतांच्या मुलींना काय कळणार गोरगरिबांच्या मुलींचे जीवन कसे असते? असा सवालही त्यांनी विचारला.

( नक्की वाचा : 'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार )
 

भाऊ देखील लाडका 

यावेळी लाडकी बहिणीबरोबर भाऊ दोडका नाही तर तोही लाडका आहे असे अजित पवार म्हणाले आम्ही शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले.शेतकऱ्यांनी पुढचं वीज बिल भरायचं नाही आणि मागचा वीज बिल द्यायचं नाही मी बघतो कस करायचा ते म्हणाले.

शेतकऱ्यांना 6 टक्के व्याजाने कर्ज देत आहेत.या सर्व योजना पुढेही सुरू राहणार आहेत असा शब्द मी तुम्हाला देतो.योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे.शेतकऱ्याला रात्री शेतात जायची गरज पडणार नाही आम्ही दिवसा वीज देणार आहोत.शेतकऱ्यांना 6 टक्के व्याजाने कर्ज आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

Advertisement

( नक्की वाचा : महाविकास आघाडीचा सरकारविरोधात एल्गार, 1 तारखेला मुंबईत... उद्धव ठाकरेंनी केली घोषणा )
 

चुकीला माफी नाही

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तसंच मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचाही सर्वांना धक्का बसला आहे. अजित पवारांनी बीडमध्ये बोलताना या दोन्ही घटनांचा उल्लेख केला. 

छत्रपती शिवाजी महाराजानी महिलांचा सन्मान केला होता.महिलांवर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे, पुढाऱ्यांचा पोट्टा असला तरी सोडणार नाही. महिलांची सुरक्षा ही सर्वोच्च आहे. केंद्र आणि राज्य सरकार महिलांची काळजी घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेली चूक ती चूकच आहे. त्याला माफी नाही,  पुढच्या दहा पिढ्यांना लक्षात राहील अशी शिक्षा केली जाईल कोणालाही सोडणार नाही.असे अजित पवार यांनी खडसावले.
 

Advertisement