जाहिरात

Beed News बीड जिल्ह्यात काय चाललंय? पुरुषांना नको झालंय आयुष्य, वर्षभरातील आकडेवारी वाचून बसेल धक्का

बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची चर्चा सुरु असतानाच जिल्ह्यातील आणखी एक धक्कादायक आणि भेसूर वास्तव समोर आलं आहे. 

Beed News बीड जिल्ह्यात काय चाललंय? पुरुषांना नको झालंय आयुष्य, वर्षभरातील आकडेवारी वाचून बसेल धक्का
प्रतिकात्मक फोटो
बीड:

विनोद जिरे, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचं नेटवर्क समोर आलं. बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची चर्चा सुरु असतानाच जिल्ह्यातील आणखी एक धक्कादायक आणि भेसूर वास्तव समोर आलं आहे. 

बीड जिल्हा आता आत्महत्येच्या प्रमाणातही वाढ होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात तब्बल 521 जणांनी आत्महत्या केली आहे. त्यामध्ये पुरुषाचे प्रमाण जास्त आहे.  521 पैकी 454 आत्महत्या या पुरुषांच्या आहेत तर 67 आत्महत्या या महिलांच्या आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कारण?

सध्याच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेतील संघर्ष कौटुंबिक अडचणी, दीर्घ आजार, वाढती बेरोजगारी, सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, नवरा बायकोमधील कमी झाले संवाद, कौटुंबिक संवादामध्ये झालेली घसरण, प्रेमप्रकरण,  अनैतिक संबंध, कोरोनानंतर विस्कटलेली कुटुंबाची घडी  न जुळून येणारी आर्थिक अडचण यासह विविध कारणांमुळे माणसांमध्ये नैराश्येची भावना ही वाढत आहे. त्यामुळे गेल्या वर्षात जिल्ह्यात तब्बल 521 जणांनी स्वतःचे जीवन संपवले आहे.

बीड जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद मुजाहिद यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, 'आजकाल माणसाच्या दैंनदिन जीवनात बदल झालेला आहे..मोबाईल, इंटरनेटचा वापर वाढलेला आहे. आर्थिक अडचणी यासह विविध समस्यांनी माणूस नैराश्यात जात आहे.. कोरोनानंतर या सारख्या गोष्टीत वाढ झाली असून रुग्णांची संख्या देखील वाढलेली आहे. यामुळं माणूस टोकाचे पाऊल उचलत आहे. या स्वरूपाचा व्यक्ती, नैराश्यात असलेली व्यक्ती, तुमच्या घरात किंवा आजूबाजूला असेल तर त्याला तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा, असं आवाहन त्यांनी केलं. 

( नक्की वाचा : Karuna Sharma : 'मला प्रेमात पाडण्यासाठी 20 कोटींची ऑफर, मुलीला उचलून...' करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप )
 

 सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे म्हणाले की, आज बीड जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे. लोकांच्या हाताला काम मिळत नाही, कोरोना नंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळं आर्थिक संकट उभा ठाकले आहे. प्रेम प्रकरण आहेत, अनैतिक संबंध, कुटुंबात कमी झालेला संवाद, सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, यासह शेकडो कारणे या आत्महत्येला कारणीभूत आहेत. महत्त्वाचे म्हणजे येथील राजकारणी आणि प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.  

आम्ही सामाजिक काम करताना आम्हाला जर चिंताग्रस्त व्यक्ती कोणी भेटले, तर त्यांचं समुपदेशन करण्याचं काम आम्ही करतो.. मात्र प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचतोलच असं नाही. त्यामुळे प्रशासनाने आता या आत्महत्या रोखण्यासाठी एक अभियान सुरू केलं पाहिजे, जेणेकरून बीड जिल्ह्यातील या आत्महत्या थांबतील, असं मत कांबळे यांनी केलं
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: