
छत्रपती संभाजीनगर: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबत नसल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी मकसानग्रस्त भागांची पाहणी करताना कशाचा ढेकळाचा पंचनामा करायचा का? असे संतापजनक विधान केले होते. यावरुन टीका होत असतानाच आता माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना आता कृषीमंत्रीपद ओसाड गावची पाटीलकी वाटू लागली आहे. कोकाटे यांचे यासंदर्भातील आणखी एक वक्तव्य समोर आले आहे. 'कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे', असे विधान त्यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान केले. कृषिमंत्रिपद म्हणजे तशी ओसाड गावची पाटीलकी. अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिलं. मात्र त्यामध्येही चांगले काम करता येते. कृषिक्षेत्रात महाराष्ट्र अव्वल आहे. आगामी काळात आणखी चांगले काम करायचे आहे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.
(नक्की वाचा- BLA Attack: बलूच लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानातील शहरावरच कब्जा, सरकारी कार्यालये ताब्यात)
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या या विधानावरुन आमदार सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेगवेगवळे मंत्री नुकसानीचे पाहणी करण्यासाठी दौरे करत आहेत. शेतकर्यांच्या बाबतीत संवेदना बाळगून काम करणे आवश्यक आहे. एखाद्या पदावर गेल्यावर आपले काम नेमके काय आहे, काय आपली दिशा आहे हे स्पष्ट असणे गरजेचे आहे.कृषी मंत्र्यांनी देखील शेतकर्यांवर भाष्य करताना संवेदनशील राहून भाष्य करावे, असे ते म्हणालेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world