जाहिरात

MNS Melava 2025: औरंगबेजाची कबर उखडावी का? राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं, काय आवाहन केलं?

Raj Thackeray Full Speech MNS Melava 2025: औरंगजेबाच्या कबरीचा वाद अन् त्यामागच्या राजकारणावरुन सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. यावेळी त्यांनी ही कबर काढावी का? यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली.

MNS Melava 2025: औरंगबेजाची कबर उखडावी का? राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं, काय आवाहन केलं?

Raj Thackeray Speech News: मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी राज्यात गाजत असलेल्या ज्वलंत मुद्द्यांना हात घालत राज्य सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचा वाद अन् त्यामागच्या राजकारणावरुन सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. यावेळी त्यांनी ही कबर काढावी का? यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले राज ठाकरे?

"आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही, असा घणाघात राज ठाकरेंनी केला.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तसेच औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. मरहट्ट्यानी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते... शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला... माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात, असे आवाहनही त्यांनी केले. 

MNS News: राज ठाकरेंच्या सभेआधी राडा! अविनाश जाधवांच्या फोटोला काळं फासलं, अंतर्गत कलह उफाळला

दरम्यान, आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं का नाही झाली कर्जमाफी ? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही ३० तारखेच्या आत पैसे भरून टाका. आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.