जाहिरात

MNS-Shivsena UBT: 'समय बडा बलवान होता है', मनसे-शिवसेना युतीवर राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य

Solapur News : देवदर्शनासाठी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सोलापुरातील शिवसैनिकांनी भेट घेतली. उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरु असताना स्थानिक पातळीवर देखील कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरु असल्याचे दिसतंय.

MNS-Shivsena UBT: 'समय बडा बलवान होता है', मनसे-शिवसेना युतीवर राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य

सौरभ वाघमारे, सोलापूर

MNS-Shivsena UBT : उद्धव ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. जनतेच्या मनात जे असेल तेच होईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात केलं होतं. मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी वक्तव्य केलं आहे. तसेच स्थानिक पातळीवर मनसे आणि शिवसेना (MNS-Shivsena UBT) सैनिकांचं मनोमिलन होताना दिसत आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देवदर्शनासाठी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सोलापुरातील शिवसैनिकांनी भेट घेतली. उद्धव ठाकरे-राज ठाकरे (RajThackeray- Uddhav Thackeray) यांच्या युतीच्या चर्चा सुरु असताना स्थानिक पातळीवर देखील कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरु असल्याचे दिसतंय.  त्यामुळेच मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे सोलापुरात ठाकरे गटाचे शहर प्रमुख  महेश धाराशिवकर आणि उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी सत्कार केला.

(नक्की वाचा-  'मनसेशी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण राज...' उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचं मोठं वक्तव्य)

छगन भुजबळ यांचा पराभव केल्यानंतर बाळा नांदगावकर प्रचंड मतांनी निवडून आले होते. तेव्हा दोन भावांनी (राज-उद्धव) जसा जल्लोष केला होता. तो जल्लोष परत यावा ही शिवसैनिक म्हणून विनंती, अशी भावना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी व्यक्त केली.  प्रताप चव्हाण यांच्या विनंतीवर बाळा नांदगावकर यांनी केवळ स्मितहास्य केले आणि आभार व्यक्त केलं. 

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

बाळा नांदगावकर यांनी म्हटलं की, "मी देखील राज साहेबांना विचारात आहे की, तुमच्या मनात नेमकं काय सुरु आहे. पण मला अजून उत्तर सापडत नाही. उत्तर सापडलं की, मी तुम्हाला नक्की सांगेन, चिंता करू नका. राज ठाकरे यांच्या मनात जे आहे तेच माझ्या मनात आहे.

( नक्की वाचा : Rashmi Thackeray : उद्धव नाही रश्मी ठाकरे पक्ष चालवतात! पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप )

बाळासाहेब ठाकरे असतानाचा तो काळ होता, जेव्हा उद्धव आणि राज यांना एकत्र करण्याचा मी प्रयत्न केला. पण एखादी गोष्ट झाली तर राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं. पण पुढे काय होईल याची मला कल्पना नाही. महाभारतात एक वाक्य आहे, 'समय बडा बलवान होता है.' या वाक्यात बरेच काही अर्थ असतात, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com