जाहिरात

'वासनाकांड'प्रकरणावरून IPS जालिंदर सुपेकरांविरोधात निघाला होता मोर्चा, 25 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

IPS Jalindar Supekar Case : जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात 2000 साली मोर्चा निघाला होता. जालिंदर सुपेकर हे त्या काळात सातारा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) म्हणून कार्यरत होते.

'वासनाकांड'प्रकरणावरून IPS जालिंदर सुपेकरांविरोधात निघाला होता मोर्चा, 25 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

राहुल तपासे, सातारा

Satara News : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर चर्चेच आलेले IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अंजली दमानिया, विजय कुंभार यांच्यासर सुषमा अंधारे यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जालिंदर सुपेकर यांच्या IPS कारकीर्दीच्या सुरुवातीलाच ते अडचणी सापडले होते.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात 2000 साली मोर्चा निघाला होता. जालिंदर सुपेकर हे त्या काळात सातारा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) म्हणून कार्यरत होते. त्याच सुमारास "हिरवा शालू" नावाचा एक चित्रपट साताऱ्यात तयार होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चित्रपटासाठी नटींची निवड होणार असल्याची बातमी पसरली आणि अनेक मुली संबंधितांशी संपर्क साधला. काही मुलींनी आपली माहिती, फोटो वगैरे संबंधितांकडे जमा केले. त्यानंतर काही मुलींना रानावनात नेऊन 'कास्टिंग'च्या नावाखाली भेटी घेतल्या गेल्याचं समोर आले.

(नक्की वाचा-  प्रत्येक PIकडून 1 तोळे सोने, 500 कोटींची मागणी.., जालिंदर सुपेकर यांच्यावरील 8 खळबळजनक आरोप)

या प्रक्रियेचा काही उच्चभ्रू लोकांनी गैरफायदा घेतला आणि काही मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर "हिरवा शालू" चित्रपटाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या संपूर्ण प्रकाराची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. प्रारंभी शहर पोलिसांनी तपास सुरू केला. पण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची सूत्रे तत्कालीन सातारा पोलीस उपअधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडे सोपवण्यात आली.

तपासाच्या नावाखाली अनेक उच्चभ्रू व्यक्तींना सुपेकर यांच्या कार्यालयात (जिल्हा परिषदेच्या शेजारी) बोलावले गेले. रात्री-अपरात्रीही काहींची चौकशी झाली. त्यामुळे अनेक लोक भयभीत झाले. या प्रकरणाला 'वासनाकांड' असे नाव दिले गेले. या प्रकरणामुळे साताऱ्याच्या अस्मितेला धक्का लागत आहे, अशा भावना व्यक्त करत सर्वपक्षीय सातारकरांनी रस्त्यावर उतरत पोलीस उपअधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात मोर्चा काढला आणि प्रकरणाचा निषेध व्यक्त केला.

(नक्की वाचा-  हगवणे कुटुंबीयांना केलेली मदत भोवली? IPS जालिंदर सुपेकरांची  ‘डाऊनग्रेड' बदली)

काही दिवसांनी हे प्रकरण निवळले. मात्र या काळात काही उच्चभ्रू लोकांनी पोलिसांकडे पैसे देऊन प्रकरण मिटवल्याची कुजबूज सुरू होती. शेवटी, ज्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते, त्या सर्वांना न्यायालयाने निर्दोष घोषित करत सुटका केली. मात्र या प्रकरणामुळे जालिंदर सुपेकर यांचं नाव सातारकरांना पुन्हा आठवलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com