
रत्नागिरी: महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार होते, मात्र रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळे ती संधी हुकली तसेच त्यांच्यामुळेच आदित्य ठाकरेंनाही मंत्रिपद द्यावे लागले असा आरोप भरत गोगावलेंनी केला होता. या आरोपांनंतर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले असून एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत रामदास कदम? (Ramdas Kadam On Eknath Shinde CM Post In MVA)
'हॉटेल रिट्रीटमध्ये ज्या आमदारांची सभा झाली त्या सभेत कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आहे असे उद्धव ठाकरे यांनीच म्हटलं होते. मगं एका रात्रीत अस नेमकं काय घडलं की एकनाथ शिंदे यांना बाजूला करून उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले याची अधिक माहिती घेतली तर गोगावले काय म्हणाले ते कळेल, वर्षाचे डोहाळे नेमके कोणाला लागले?' हे स्पष्ट होईल असा मोठा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केली आहे.
तसेच 'बाप मुख्यमंत्री बेटा कॅबिनेट मंत्री आणि नेता रामदास कदम आउट. सगळा महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला. शिवसेना प्रमुखांनी हयातभर कुठलाही पद घेतलं नाही. सगळी पदे शिवसैनिकांना दिली. बाळासाहेब असते तर हे होऊ दिलं नसते,' असंही रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले.
नक्की वाचा- Sudhakar Badgujar Joins BJP : दूध का दूध और पानी का पानी होगा! ठाकरेंना बडगुजरांचा इशारा)
मनसे- शिवसेना युतीवर मोठे विधान (Ramdas Kadam On BMC Elections)
'वरळीत तुमचा मुलगा उभा राहिला त्याला मनसेने पाठिंबा दिला आणि राज यांचा दादर मधून उभा राहिला तेव्हा तुम्ही त्याला पाडले. दोगलेपणा पहायचा असेल तर उध्दव ठाकरेंकडे बघा. उध्दव ठाकरेंची इज्जत निघून चालली आहे, मनसेसोबत आल्यावर इज्जत वाचेल अस त्यांना वाटत असेल. त्यामुळे ते मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील, असे म्हणत मुंबईतील मराठी माणूस उध्दव ठाकरेंमुळे हद्दपार झाला, महापालिका उद्धव ठाकरेंकडे कधीच येणार नाही,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world