
Maharashtra Marathi Hindi Language Row : महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी हिंदी ही तिसरी भाषा (Hindi third default language in Maharashtra schools) म्हणून 'अनिवार्य' करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला होता. हा निर्णय बदलण्यात आला असून ( Maharashtra govt. revised notification) हिंदी ही अनिवार्य भाषा नसेल मात्र हिंदीऐवजी इतर कोणती भाषा शिकायची असेल तर त्यासाठी ती भाषा निवडणारे किमान 20 विद्यार्थी तरी असावेत असे सरकारने काढलेल्या नव्या आदेशात म्हटले आहे. एकीकडे हा वाद सुरू असताना मराठी भाषा वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अधिकाधिक मुलांनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावे अशी मागणी केली जाते. मात्र प्रत्यक्षात असे होताना दिसत नसून यामुळे मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत. या चिंताजनक चित्राला छेद देणारी एक सुखद घटना कोल्हापुरात घडली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने एक आदर्श उदाहरण समोर ठेवलं. ही घटना कोल्हापुरातून समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमेरिकेत पतीसोबत राहणाऱ्या आणि व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या एक महिलेने मोठं पाऊस उचललं आहे. मुलगा आपलं मूळ विसरू नये यासाठी या महिलेने आपल्या सात वर्षांचा मुलाला सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल केलं आहे. विहान असं या मुलाचं नाव आहे. सात वर्षांचा विहान यापुढे काकांसोबत सांगलीत राहणार आहे. आई-वडील अमेरिकेत असताना हा मात्र आपल्या चुलत भावासोबत जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन शिक्षण घेईल. (NRI couple enrolls their son in ZP School)
नक्की वाचा - Marathi Municipal School Closed : मराठी भाषा कशी वाचणार? गेल्या 13 वर्षात 131 मराठी शाळांना लागलं कुलूप
मूळ विसरता कामा नये, मातृभाषा विसरत असल्याचं पाहून धक्का बसला...
विहानची आई भारती विजयकुमार शेळके यांनी सांगितलं की, याआधी विहान अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना येथील एका शाळेत शिकत होता. मात्र तो मोठा होत असताना आपली मातृभाषा विसरत असल्याचं पाहून आम्हाला धक्का बसला. त्याने मराठी शिकावं अशी आमची इच्छा होती. हे त्याचं योग्य वय आहे, असं आम्हाला वाटलं. त्यामुळे त्याला महाराष्ट्रातील शाळेत दाखल करण्याचा आम्ही निर्णय घेतला. दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आम्ही त्याला झेडपीच्या शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला.
भारती शेळके यांचे पती विजयकुमार 15 वर्षांपासून अमेरिकेत अभियंता म्हणून काम करतात. भारती लग्नानंतर साधारण 2026 मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. शेळके दाम्पत्याला दोन मुलं आहे. दुसरा मुलगा दोन वर्षांचा आहे. सध्या विजयकुमार यांच्याकडे L1 व्हिसा आहे. तर भारती यांच्याकडे L2 व्हिसा आहे. L1 व्हिसा धारकांना पती-पत्नी आणि अविवाहित मुलांना स्वत:सोबत अमेरिकेत राहण्याची परवानगी असते. त्यांचा व्हिसा संपण्यासाठी अजून दीड वर्ष शिल्लक आहेत. त्यानंतर आम्ही पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेऊ शकतो, असंही भारती यावेळी म्हणाल्या. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world