
राकेश गुडेकर, रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर नौका विसावल्या असून यांत्रिक मासेमारी आजपासून 2 महिने बंद राहणार आहे. बंदी काळात समुद्रात मासेमारी करताना आढळल्यास कारवाई होणार असल्याचे मत्स्य विभागाने सांगितले आहे. यांत्रिक मासेमारी बंद असली तरी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांना बंदी लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढचे दोन महिने यांत्रिक मासेमारी बंद असणार आहे. त्यामुळे शेकडो नौका आता कोकणातील किनाऱ्यावर विसावल्या आहेत.. दरवर्षी पावसाळ्यातील मासेमारीला 1 जून ते 31 जुलैपर्यंत मत्स्य विभागाकडून बंदी घालण्यात येते. ही बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहणार आहे. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित नौकांना बंदी असणार नाही. बिगर यांत्रिक बोटीला खाडीपात्र हवामान शांत असताना किनाऱ्यालगत मासेमारी करता येऊ शकते.
बंदीच्या कालावधीत मासळीच्या प्रजोत्पादनाला पोषक वातावरण असतं. तसेच या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे या काळात मासेमारी बंदी केली जाते. दरम्यान या बंदी काळात मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. या बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेला अपघात झाल्यास शासनाकडून नुकसानभरपाई देखील मिळणार नाही, असं मत्स्य व्यवसाय विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Pune News : पुण्यात भरधाव कारने 12 जणांना उडवले, MPSC चे विद्यार्थी जखमी
15 दिवस आधीच सुरू झाली बंदी
दरम्यान, अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्याचा मोठा फटका मासेमारी व्यवसायाला बसल्याने यंदाचा हंगाम संपण्यापूर्वीच 15 दिवस आधीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world