जाहिरात

Kunal Patil : काँग्रेसमध्ये नाराज नसूनही कुणाल पाटील पक्ष का सोडणार? खरं कारण उघड

Kunal Patil :  महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेलं आऊटगोईंग अजूनही सुरुच आहे. आता धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Kunal Patil : काँग्रेसमध्ये नाराज नसूनही कुणाल पाटील पक्ष का सोडणार? खरं कारण उघड
मुंबई:

Kunal Patil :  महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेलं आऊटगोईंग अजूनही सुरुच आहे. आता धुळ्याचे माजी  आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण हा भाजपामध्ये प्रवेश स्वमर्जीतून करत आहोत.  आपली पक्षावर नाराजी नाही, तसंच यासाठी कोणताही दबाव नाही, असं पाटील यांनी सांगितलं. पण, महाविकास आघाडीमुळे पक्षाचा विकास होऊ शकला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

महाविकास आघाडीमुळे नुकसान!

कुणाल पाटील हे धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्याचबरोबर राहुल गांधींचे निकटवर्तीय अशीही त्यांची पक्षात मोठी ओळख होती.आपली पक्षावर नाराजी नाही, आपण फक्त विकास कामांसाठी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं पाटील यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना सांगितलं. 

पण, त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये राहून काँग्रेस कधीही वाढू शकत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी वर-वर एकत्र दिसत असली तरी अंतर्गत धुसफूस कायम होती. काही ठराविक नेत्यांमुळे कामं व्हायची नाहीत. कार्यकर्त्यांमध्ये देखील असंतोषच वातावरण तयार झाल होतं. विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय देखील आला, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं )

काँग्रेस पक्ष जर आगामी निवडणूका स्वबळावर लढणार असेल तर ते जिंकू शकतील. महाविकास आघाडीमध्ये राहून कधीही जिंकू शकणार नाही, असा दावा पाटील यांनी केला. आता काँग्रेसमध्ये नेतृत्त्व राहिलेलं नाही. त्यामुळे कामं देखील होतं नाहीत याची तक्रार वरिष्ठकडे करून देखील काही उपयोग झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

भाजपामध्ये राहूनच विकास होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली विकास कामं वेगानं होत आहेत आणि म्हणूनच आपण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षात देखील विकास झाला मात्र आता काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने विकास पुढे होईल असं वाटतं नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फार त्रास दिला नाही. उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आम्हाला आणि माझ्या जिल्ह्याला मदत केली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचं कुणाल पाटील यांनी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com