Malegaon Sugar Factory Election: बारामतीवर वर्चस्व कोणाचे काकांचे का पुतण्याचे याचे उत्तर अद्याप महाराष्ट्राच्या जनतेला मिळू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule), सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) पराभव केला तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी (Ajit Pawar) युगेंद्र पवारांचा (Yugendra Pawar) पराभव केला. त्यामुळे सध्या बारामतीमधली काका-पुतण्याची ताकद ही समसमान असल्याचे वरकरणी तरी दिसते आहे. या प्रश्नाचे उत्तर देणारी आणखी एक निवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत( Malegaon Sugar Factory Election) . या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. कुंडमळा दुर्घटनेपेक्षाही त्यांनी या निवडणुकीच्या प्रचाराकडे जास्त लक्ष दिले होते असा आरोप केला जातो. यावरून ही निवडणूक त्यांनी किती प्रतिष्ठेची केली आहे याचा अंदाज येतो.
( नक्की वाचा : बारामतीत हायहोल्टेज ड्रामा! PDCC बँक रात्री 11 वाजता उघडी, पैसे वाटल्याचा आरोप )
माळेगाव साखर कारखान्याची निवडणुकीत कोणाची कोणाशी लढत?
या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नीळकंठेश्वर पॅनेल (Nilkantheshwar Panel), शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल (Baliraja Sahakar Bachao Panel) या कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजप नेते चंद्रकांत तावरे आणि रंजन तावरे यांचे (Sahkar Bachao Shetkari Panel) आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल अशी चौरंगी लढत होतेय. मात्र मुख्य लढत ही नीळकंठेश्वर आणि बळीराजा सहकार बचाव पॅनेलमध्ये आहे. 21 संचालक पदांसाठी 90 उमेदवार रिंगणात असून, ही निवडणूक बारामतीवर वर्चस्व कोणाचे हे ठरवणारी असेल.
(नक्की वाचा : 'गेले त्यांची चिंता करू नका, संधीसाधूंना कधीच बरोबर घेणार नाही' पवारांनी ठणकावले )
माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक कधी आहे ? ( Malegaon Sugar Factory Election Voting Date)
2015 साली या कारखान्यासाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला होता. 2020 च्या निवडणुकीत मात्र त्यांच्या पॅनलने विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत कारखान्याच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजित पवार यांनी स्वत:चे नाव जाहीर केले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेणारे 19 हजार 600 मतदार आहेत. 22 जून रोजी या कारखान्याची सूत्रे कोणाच्या हातात द्यायची याचा फैसला हे सगळे मतदार करणार आहेत.
शेतीसाठी AI चा वापर प्रचाराचा मुद्दा
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: उमेदवार म्हणून उतरलेत. गेल्या पाच वर्षांत कारखान्याने केलेली उत्तम कामगिरी, ऊसाला दिलेला चांगला दर, AI तंत्रज्ञानाचा वापर या तीन मुद्दांवर अजित पवारांच्या नीळकंठेश्वर पॅनेलले जोर दिला आहे. “आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलंय, कारखाना नफ्यात आहे. शेतकरी आमच्याच पाठीशी आहे,” असं अजित पवारांनी म्हटले आहे. स्थानिक सहकार क्षेत्रावर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी अजित पवारांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
(नक्की वाचा : 'मी चांगलं काम करेन की 85 वर्षांचा माणूस?' अजित पवारांनी पुन्हा काढला वयाचा मुद्दा )
'बळीराजाचे'शेतकरी हिताला प्राधान्य
शरद पवारांचा ‘बळीराजा सहकार बचाव' पॅनलने शेतकरी मतदारांना भावनिक साद घातली आहे. शरद पवारांनी आपला सगळा अनुभव या निवडणुकीसाठी पणाला लावला असून प्रचारामध्ये ‘शेतकरी हित' याला आम्ही प्राधान्य देणार असल्याचे बळीराजा पॅनेलने म्हटले आहे. “सहकार हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे, तो जपण्यासाठी आमचा लढा आहे,” असं या पॅनलसाठी प्रचार करणाऱ्यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी या निवडणुकीसाठी पडद्यामागे राहात रणनिती आखण्याचे काम केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर होणारी ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती राहिलेली नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील ‘दादा-काका'मधील युद्ध आता गावपातळीपर्यंत पोहोचलं आहे. अजित पवारांनी स्थानिक शेतकरी आणि सहकारी नेत्यांना एकत्र आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केलाय. शरद पवारांच्या पॅनेलचे नेतृत्व युगेंद्र पवार यांच्याकडे असून शरद पवारांनी पडद्यामागे राहात रणनिती आखण्याचे काम केले आहे. या निवडणुकीत सगळ्यात जास्त प्रतिष्ठा ही अजित पवारांची पणाला लागली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावातल्या पारावर चर्चा दादा जिंकणार का पडणार हीच सुरू आहे.