जाहिरात

Mumbai BJP : कोण होणार मुंबई भाजपा अध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस, निर्णय कधी?

Mumbai BJP President : मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अद्याप कोणतीही हलचाल होत नसल्यानं या पदासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.

Mumbai BJP : कोण होणार मुंबई भाजपा अध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस, निर्णय कधी?
Mumbai BJP President : मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी 3 नेत्यांमध्ये स्पर्धा आहे.
मुंबई:

Mumbai BJP President : महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत केंद्रीय समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांची याबाबत निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे 'NDTV मराठी' ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारपर्यंत विद्यमान कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत घोषणा होईल. चव्हाण गेल्या काही महिन्यांपासून कार्याध्यक्ष म्हणून राज्यात सर्वत्र फिरत आहेत. प्रदेशाध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झालाय. पण, मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अद्याप कोणतीही हलचाल होत नसल्यानं या पदासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुणामध्ये आहे स्पर्धा? 

माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार अमित साटम तसेच माजी आमदार सुनील राणे हे मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. या तिन्ही नेत्यांनी पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी लॉबिंग देखील सुरू केले आहे. एका बाजूला महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड होण्याबाबतच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या असून मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत मात्र अद्यापही शांतता आहे. त्यामुळे दरेकर, साटम आणि राणे या नेत्यांच्या इच्छुकांच्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता पसरली आहे.

दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांचा उल्लेख भावी प्रदेशाध्यक्ष म्हणून केला होता. त्यामुळे चव्हाण यांच्या निवडीची आता फक्त औपचारिकता बाकी आहे. 

( नक्की वाचा : 'सरकारच्या विरोधात मत मांडलं की फोन येतात' आणीबाणीचं स्मरण करत शरद पवारांचा गौप्यस्फोट )
 

मुंबई भाजपाचं अध्यक्षपद सध्या कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांच्याकडे आहे. भाजपाच्या एक पद, एक व्यक्ती नियमानुसार शेलार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानं प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागणार आहे. तूर्तास आशिष शेलार यांना मुंबई महापालिका निवडणूक होईपर्यंत कायम ठेवावे आणि त्यानंतरनच मुंबई अध्यक्ष पदाची नव्याने निवड करावी असा एक सूर भाजपामध्ये अंतर्गत आहे.

विशेष म्हणजे आशिष शेलार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शेलार यांना मुंबई महापालिका निवडणुका संपेपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरिकडं मुंबई भाजपा अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडावी म्हणून प्रवीण दरेकर, अमित साटम हे देखील लॉबिंग करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे नेते प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com