शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी धमाकेदार भाषण केलं. यात त्यांनी भाजप बरोबर शिवसेना शिंदे गटावर जहरी टिका केली. शिवाय भाजपचं हिंदूत्व नक्की आहे तरी कसं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना त्यांनी देशाला सध्या पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्र्यांची गरज असल्याचं सांगत केंद्र सरकारवर ही जोरदार टीका केली. केंद्रात मोदींचं सरकार आलं आणि पनवती सुरू झाली अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जे आपला बाप बदलतात त्यांना काय म्हणावे. राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत, मी राजकारणात म्हणतोय, अशी लोक आपल्यावर घराणेशाहीवर टीका करतात. त्यांची आपल्याला किव वाटते असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुला होत नाहीत राजकारणा पोरं तर मी काय करू. आमच्याकडे आहेत. किती पाहीजेत तुम्हाला घ्या. भाजप असाच आहे. असं म्हणत सध्या सुरू असलेल्या पक्ष प्रवेशावर त्यांनी जोरदार टिका केली. दुसऱ्यांचे नेते स्विकारचे, त्यांना मोठं करायचे हे भाजपचे कर्तूत्व आहे. या चोरांना लाजलज्जा शरम नाही असं ही ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Uddhav Thackeray: राज ठाकरेंबरोबर युती होणार? उद्धव ठाकरेंचं सुचक वक्तव्य काय?
भाजपने जनतेला खोटी आश्वासनं दिली. ती ते पूर्ण करत नाहीत. यावरून भाजपची वृत्ती कळते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर पनवती लागली आहे. सर्व कामांची वाट लागली आहे. एअरपोर्टचं छत गळतं. मेट्रोत पाणी घुसतं. प्रयागराजमध्ये चेंगराचंरगी, विमान अपघात कोणी, पहलगममध्ये हल्ला होतो. पण त्याची जबाबदारी कुणी घेत नाही. देशाला सध्या पंतप्रधानांची गरज आहे. सध्या पंतप्रधान आहेत पण ते फक्त भाजपचे आहेत. देशाला गृहमंत्र्याची गरज आहे. घरफोड्या अमीत शहांची नाही. अशी टीका ही उद्धव यांनी यावेळी केला.
ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपवाले घराघरा सिंदूर वाटत आहेत. हे वाटणारे सर्व भ्रष्ट लोकं. त्यांना जोड्याने मारलं पाहीजे. नालायक मंत्री विजय शहा त्याला चापकाने फोडला पाहीजे. तो आपल्या सैन्यातील बहिणीबद्दल काय म्हणाला. त्यावर कारवाई भाजप करत नाही. नालायक अवलाद भाजपमध्ये आहे. अशी टिकाही त्यांनी केली. भाजपवाले शेपट्या घावून बसतात. सैन्याचे पाय तुम्ही बांधले. नाहीतर आपल्या सैन्याने पाकिस्तानपर्यंत धडक दिली असती. पण ट्रम्पचा एक फोन आला. त्यानंतर यांचा आवाजच गेला. असं म्हणत युद्धातून अमेरिकेच्या इशाऱ्यावर मोदींनी कशी माघार घेतली हे त्यांनी सांगितलं.
पहलगामध्ये ते चार अतिरेकी आत आले कसे? संरक्षण मंत्री, गृहमंत्री काय करत होते? ते अतिरेकी आता गेले कुठे? पाताळात गेले. आकाशात गेले की भाजपमध्ये गेले. अजून मिळत कसे नाहीत. हे भाजपवाल्यांना सांगता येत नाही. त्यांना ही त्यांनी घेतले की काय असा टोलाही उद्धव यांनी लगावला. आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहीलं आहे. बाकी सर्व जण घेतले आहेत, अशी बोचरी टीकाही उद्धव यांनी केला. शिवसेना संपवण्याचे ते स्वप्न पाहात आहे. अरे तुम्ही किती स्वप्न पाहा, अरे शिवसेना तुम्हाला संपवून, तुमच्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना खतम करून तुमच्या छाताडावर भगवा नाही रोवला तर शिवसेना म्हणून नाव नाही सांगणार असा इशाराही शेवटी उद्धव यांनी दिला.
ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आजी अन् नातीचं शव, 7 दिवसानंतर ओळख पटली, तो Video...
शिवसेनेच्या स्थापने वेळी मी शिवाजी पार्कात मैदानात माँच्या मांडीवर बसलो होतो. आज ज्यांना दाढी फुटली आहे. जे दाढी खाजवत आहेत ते त्यावेळी कुठे होते माहित नाही. असा टोलाही उद्धव यांनी यावेळी लगावला. यावेळी उद्धव यांनी मंत्री आणि भाजपनेते नितेश राणे यांचे नाव न घेता समाचार घेतला. एक बेडूक ओरडतो आहे. त्याला तेवढचं काम दिलं आहे. अरे तुझी उंची केवढी. आवाज कसा. उंची पेंग्विनची. चाल बदकाची. आवाज कोंबडीचा. डोळे कुणासारखे माहित नाही. जीव काय? बोलतोय काय? वडीलांची पार्श्वभूमी काय? आणि आमच्यावर बोलतो. एक कोण तरी बाप ठरव. असं उद्धव यावेळी म्हणाले.