जाहिरात

IPL 2025 Final : RCB vs PBKS सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? पाऊस पडण्याची शक्यता किती?

IPL Final 2025 : नॉक-आउटमधील इतर सामन्यांप्रमाणेच या सामन्यासाठीही 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. परंतु, जर 3 जून रोजी पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर 4 जून रोजी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

IPL 2025 Final  : RCB vs PBKS सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? पाऊस पडण्याची शक्यता किती?

IPL 2025 Final : आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात RCB आणि PBKS जेतेपदासाठी भिडणार आहेत. दोन्ही संघांनी या हंगामात शानदार खेळ करत अंतिम फेरी गाठली आहे. आज आयपीएलला एक नवीन विजेता मिळणार आहे. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकलेले नाही. दोन्ही संघ 18 वर्षांपासून लीगमध्ये खेळत आहेत, परंतु जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली आहे. पंजाब किंग्ज दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर आरसीबी चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

खेळपट्टी कशी असेल?

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम फलंदाजीसाठी अनुकूल असण्याची अपेक्षा आहे. आयपीएल 2025 मध्ये खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांपैकी 6 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. तर गेल्या सामन्याप्रमाणे यावेळीही दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

(नक्की वाचा-  IPL Final Predictions: IPL 2025चा विजेता कोण? AI ने केली मोठी भविष्यवाणी; 'हा' संघ बाजी मारणार?)

अहमदाबादमध्ये हवामान कसं असेल?

AccuWeather च्या मते, आज म्हणजेच मंगळवारी पावसाची शक्यता 64 टक्के आहे. सामन्यादरम्यानही ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. AccuWeather च्या मते, संध्याकाळी पाऊस पडू शकतो. पावसामुळे टॉस देखील लांबू शकतो. 

(नक्की वाचा-  RCB फॅन्समध्ये लोकप्रिय असलेल्या 'EE Sala Cup Namade' या घोषणेचा अर्थ काय?)

सामना रद्द झाला तर काय?

नॉक-आउटमधील इतर सामन्यांप्रमाणेच या सामन्यासाठीही 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. परंतु, जर 3 जून रोजी पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर 4 जून रोजी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.  या दिवशी सामन्याचा निकाल येऊ शकतो. पण जर दोन्ही दिवशी पावसामुळे सामन्याचा निकाल येऊ शकला नाही, तर पंजाब किंग्सला चॅम्पियन म्हणून घोषित केले जाईल. गुणतालिकेत पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुपेक्षा वर होते.त्यामुळे त्यांना आयपीएल 2025 ची ट्रॉफी मिळेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com