जाहिरात

रोहित आणि विराटनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय कधी घेतला? BCCI नं सांगितलं रहस्य

Rohit Sharma and Virat Kohli Test Retirement  रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या वक्तव्यावर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरने मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहित आणि विराटनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय कधी घेतला? BCCI नं सांगितलं रहस्य
मुंबई:

Rohit Sharma and Virat Kohli Test Retirement  इंग्लंड दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India Squad for England Series) झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय टीमची ही पहिलीच सीरिज आहे. रोहितच्या जागेवर शुबमन गिलची (Shubman Gill) टेस्ट टीमच्या कॅप्टनपदी निवड करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरने अनेक प्रश्नांची कौशल्यानं उत्तरं दिली. त्याला  विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने गौतम गंभीरच्या वक्तव्याची री ओढत सांगितले की , 'निवृत्ती हा वैयक्तिक निर्णय आहे.'

आगरकरने यावेळी टीम इंडियाच्या या दोन्ही दिग्गजांची जोरदार प्रशंसा केली. तो म्हणाले, 'ते टेस्ट क्रिकेटमध्ये आमच्यासाठी मोठे खेळाडू होते. संघात त्यांची जागा घेणे खूप मोठी गोष्ट आहे.'

India Test Squad for ENG Tour : इंग्लंड दौऱ्यासाठी शमीची निवड का झाली नाही? आगरकरनं सांगितलं कारण

( नक्की वाचा :  India Test Squad for ENG Tour : इंग्लंड दौऱ्यासाठी शमीची निवड का झाली नाही? आगरकरनं सांगितलं कारण )

आगरकरने कोहलीच्या निवृत्तीबद्दल बोलताना सांगितले की, त्याने एप्रिलमध्ये त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी कोहलीने सांगितले होते की, त्याला दीर्घ फॉरमॅटमधून (टेस्ट) निवृत्त व्हायचे आहे. आम्ही विराटच्या निर्णयाचा आदर करतो, असेही आगरकरनं यावेळी स्पष्ट केलं. 'असे खेळाडू निवृत्त होतात, तेव्हा एक मोठी पोकळी भरून काढावी लागते. अश्विननेही काही दिवसांपूर्वीच निवृत्ती घेतली आहे. हे तिन्ही खेळाडू आमचे दिग्गज होते,' असं आगरकर म्हणाला. 

आगरकरने पुढे सांगितले की, 'मी त्या दोघांशी (रोहित आणि विराट) बोललो होतो. एप्रिलच्या सुरुवातीला विराटने माझ्याशी संपर्क साधला होता आणि सांगितले होते की त्याला आता थांबायचे आहे.'
कदाचित हीच त्यांच्या निरोप घेण्याची वेळ होती. असे खेळाडू असे निर्णय घेतात, तेव्हा आपण त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. त्या दोघांनी तो आदर कमावला आहे.'

इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय टीम इंडिया

शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाईस कॅप्टन/विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com