बीड जिल्ह्यामध्ये लग्नाळू मुलांचं लग्न लावून फसवणारी टोळी ही सक्रिय असल्याचं समोर आलंय. या प्रकरणामध्ये दोन गुन्हे दाखल झाले असून सात जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. आष्टी तालुक्यातील अंबोरा पोलीस ठाणे आणि वडवणी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.