राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवली आहे. 'न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर पडू शकते,' असे खुद्द अजित पवारांनी सांगितल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विविध कारणांमुळे नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका आधीच लांबल्या आहेत.