काल झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय. कालसारख्या घटना टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य प्रयत्न करणार असल्याचं फडणवीस म्हणाले. गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलल्या असून भाडेवाढ न करता एसी लोकल्स देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.