काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील भाजप नेते अन्नामलाई यांनी मुंबई शहराबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ठाकरे बंधूंनी अन्नामलाईवरती जोरदार टीका केली आणि इशारा दिला होता. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. अन्नामलाईवर जे ठाकरे बोलले तो तामिळ भाषिकांचा अपमान नाही का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय.