Manoj Jarange यांच्या मागण्या सरकारकडून मान्य; आंदोलकांचा मुंबईत जल्लोष | NDTV मराठी

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर मुंबईतील आंदोलकांनी जोरदार जल्लोष केला. आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलकांना विजयाची घोषणा केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंद साजरा केला. मराठा आरक्षणाच्या लढ्यातला हा एक मोठा विजय मानला जात आहे.

संबंधित व्हिडीओ