रेल्वे दुर्घटनेविरोधात रेल्वे प्रशासनावर मनसेनं मोर्चा काढला. स्टेशन मास्तर कार्यालयात मनसेनं निवेदन दिलंय. प्लॅटफॉर्म वरील फूड स्टॉल्स काढा अशी मागणी निवेदनात मनसेनं केली आहे. शिवाय मनसेनं रेल्वे प्रशासनाला आठ दिवसांचं अल्टिमेटम दिलंय. ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.