रेल्वे दुर्घटने विरोधात रेल्वे प्रशासनावर मनसेचा मोर्चा धडकला. ठाण्यामधील गावदेवी मैदानापासून ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा आता निघालेला आहे. लोकल अपघातामध्ये मुंबईकरांचा मृत्यू होतोय आणि अनेक मुंबईकरांचा लोकल प्रवासामध्ये जीव गेलेला आहे. कालच्या दुर्घटनेनंतर मनसेनं धडक मोर्चा काढून आता या सगळ्या संदर्भात रेल्वे प्रशासनाला जाब विचारलाय.