पहलगामधील या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला असून संतापाचं वातावरण आहे.उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या निरपराध लोकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं.प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशासह राज्यातून शोक व्यक्त केला जातोय.लखनौ, त्रिपुरा, तेलंगणा, लुधियाना.. सह अनेक ठिकाणांहून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय.