
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गौरवशाली महाराष्ट्र 2025 हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्याचे आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नारायण राणे आणि अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या माजी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडं पाठ फिरवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना हाच धागा पकडत टोला लगावला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आले त्यांचा सत्कार
सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर आनंद झाला असता कारण हा राजकीय मंच नाही. जरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राचा सत्कार होता. त्यामुळे जे आले त्यांचा सत्कार आहे जे नाही आले त्यांचा मनातून सत्कार आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी हा टोला कुणाला लगावला? शरद पवार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? ही चर्चा सुरु झाली आहे.
( नक्की वाचा : 'मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे नक्की मुख्यमंत्री झाले असते,' शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं कारण )
अजित पवारांच्या नावावर विक्रम
महाराष्ट्रातील नेत्यांनी कुणी मुख्यमंत्री झाले, कुणी उपमुख्यमंत्री झाले कुणी मंत्री झाले सर्वांचे जडणघडणीत योगदान आहे. लोकांना वाटतं मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो पण, मी तीन वेळा मुख्यमंत्री झालो. एकदा मी 72 तास होतो. अजित पवारांच्या नावावर सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा तसंच सर्वात कमी काळ उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड आहे. ते माझ्या मंत्रिमंडळात 72 तास उपमुख्यमंत्री होती. आज जे सरकार दिसतंय त्याची मुहूर्तमेढ त्या 72 तासांमध्येच मुहुर्तमेढ रोवली होती, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का? 'या' पद्धतीनं करा चेक )
संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाची चळवळ ठरली. स्वातंत्र्योत्तर काळात कदाचित कोणत्याही राज्याला इतका संघर्ष करावा लागला नाही जितका संघर्ष संयुक्त महाराष्ट्राला मुंबईसह महाराष्ट्रासाठी करावा लागला. या लढ्यात 106 लढवय्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं.
भाषावार प्रांत रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीनं विदर्भ हे वेगळं राज्य व्हावं अशी शिफारस केली होती. पण, मराठी भाषिकांचं एक राज्य व्हावं अशी साद घातली. आपलं मराठीपण जपण्यासाठी एक आलं पाहिजे असा निर्णय विदर्भातील नेत्यांनी घेतला. त्यामधून नागपूर करार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world