Mumbai Metro : मुंबई महानगर भागातील वाढती लोकसंख्या आणि ट्रान्सपोर्टची आवश्यकता पाहता मेट्रो १४ प्रोजेक्ट पुन्हा एकदा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात शिळफाटा ते बदलापूर मार्ग विकसित करण्यास प्राथमिकता दिली जाऊ शकते. त्यामुळे बदलापूर आणि जवळपासच्या भागात राहणाऱ्या लाखो रहिवाशांना दररोजच्या प्रवासात मोठा दिलासा मिळू शकतो.
दुसऱ्या टप्प्यात ठाणे खाडीतून कांजूरमार्गापर्यंत विस्तार...
मुंबई मेट्रोपॉलिटन भागातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प मेट्रो १४ जलद गतीने वाढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याची रणनीती हा एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे. पहिल्या टप्प्यात शिळफाटा ते बदलापुरपर्यंत साधारण २५ किलोमीटरचा मार्ग विकसित केला जाऊ शकतो. काही वृत्तांनुसार, या मार्गावरील एक भाग मेट्रो १२A लाइनच्या समांतर चालेल. हा प्रस्तावित मार्ग भविष्यात बदलापूर, निलजे, घणसोली, महापे आणि शिळफाटातील नागरिकांना चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. जलद गतीने शहरीकरण होणाऱ्या या भागातून प्रवास करणाऱ्यांसाठी याचा मोठा फायदा होईल.
कसं होईल काम?
सुरुवातीला हा प्रकल्प पीपीपी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनशीप मॉडलअंतर्गत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ती पद्धत यशस्वी होऊ शकली नाही. आता इंजिनियरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन मॉडेलवर विचार केला जात आहे. जे प्रत्येक काम टप्प्यात पूर्ण करू शकतील.
शिळफाटा ते कांजूरमार्ग आव्हानात्मक मार्ग...
दुसऱ्या टप्प्यात शिळफाटा ते कांजूरमार्गपर्यंत महत्त्वाचा मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. हा टप्पा अधिक आव्हानात्मक मानला जात आहे. कारण यामध्ये ठाणे खाडीच्या खाली मेट्रो लाइन तयार करावी लागेल. पर्यावरण विभागाची मंजुरी आणि अनेक तांत्रिक प्रक्रियांमध्ये हा टप्पा पूर्ण होण्यास अधिक वेळ लागू शकतो. या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता, अंदाजे प्रवासी संख्या आणि तांत्रिक व्यवहार्यता यांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी एक सल्लागार समिती नियुक्त करण्याची तयारी सुरू आहे. समितीच्या अहवालानंतर अंतिम योजना निश्चित केली जाईल आणि पुढील निर्णय घेतले जातील.
या प्रकल्पामुळे मोठा फायदा...
मुंबई मेट्रो १४ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बदलापूर आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना प्रवासात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये इस्टर्न सबर्ब्स, ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ट्रान्जिट नेटवर्क मजबूत करण्यास मदत मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world