
Mumbai Rains : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 23 जून रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील एकूण जलसाठा 28.21 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये सध्या 4,08,299 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा साठा त्यांच्या एकूण क्षमतेच्या 28.21 टक्के इतका आहे.
(नक्की वाचा- Ujani Dam : उजनी धरण 76.27 टक्के क्षमतेने भरलं, भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला)
सात जलाशयांमधील पाणीसाठा
- मोडकसागर: 44.78 टक्के
- विहार: 39.71 टक्के
- तुळशी: 38.48 टक्के
- अप्पर वैतरणा: 33.35 टक्के
- तानसा: 30.04 टक्के
- मध्य वैतरणा: 26.47 टक्के
- भातसा: 23.14 टक्के
मुंबईला पाणीपुरवठा कसा केला जातो?
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. दहिसर चेक नाक्यापासून वांद्रेपर्यंतची पश्चिम उपनगरे आणि माहीम ते मलबार हिलपर्यंतच्या शहराच्या पश्चिम भागाला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि तानसा या जलाशयांमधून पाणी मिळते.
(नक्की वाचा- PM Kisan 20th Installment Date: 20 वा हफ्ता जमा कधी येणार? जाणून घ्या EKYC ची प्रक्रिया)
पूर्व उपनगरे आणि शहराचा पूर्व भागाला भातसा, विहार आणि तुळशी या तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. येथून येणारे पाणी पांजरपोळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते आणि मुलुंड चेक नाक्यापासून शीवपर्यंतची पूर्व उपनगरे तसेच माझगावपर्यंतच्या शहराच्या पूर्व भागात वितरित केले जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world