एनडीएच्या (NDA) मंगल मिलन बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' (NEET) मधील पेपरफुटी प्रकरणावर अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे हे पाप करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे," असा स्पष्ट इशारा देत पंतप्रधानांनी या प्रकरणात कोणाला(नक्की वाचा- CJP Protest: जंतर-मंतरवर दुसऱ्या दिवशी काय आहे परिस्थिती? आंदोलन संपलं की सुरु राहणार?)ही पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. या बैठकीत पंतप्रधानांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि अभेद्य बनवण्यासाठी कठोर उपाययोजना राबवल्या जात असल्याचे सांगितले.
'पेपरफुटीवर कारवाई झाली, 13 जण तुरुंगात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत NEET परीक्षेबाबत माहिती देताना सांगितले की, "जेव्हा पेपरफुटीची घटना उघडकीस आली, तेव्हा सरकारने तात्काळ कठोर पावले उचलली. या प्रकरणात 13 जणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान किंवा भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी फेरपरीक्षा घेण्यात आली. ही फेरपरीक्षा अत्यंत यशस्वीरित्या पार पडली असून तिचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत."
भविष्यकाळात देशात अशा प्रकारच्या पेपरफुटीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने परीक्षा यंत्रणेत अमूल्य बदल करत कठोर पावले उचलली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
'हा पक्षीय राजकारणाचा विषय नाही; सर्वांनी एकत्र यावे'
पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "हा विषय केवळ केंद्र सरकार किंवा राज्य सरकारपुरता मर्यादित नाही. तसेच हा पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला संवेदनशील प्रश्न आहे. त्यामुळे प्रणाली अभेद्य बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. या प्रकरणात दोषींना कायदेशीर चौकटीत कठोर शिक्षा देण्यासाठी ज्येष्ठ वकिलांनीही सहकार्य करावे."
(नक्की वाचा- Kolhapur News: संत बाळूमामा ट्रस्टमध्ये 60 कोटींचा घोटाळा; तत्कालीन धर्मादाय निरीक्षकासह कंत्राटदारावर गुन्हा)
आगामी संसद अधिवेशनात एनडीए (NDA) अत्यंत सकारात्मक भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करताना पंतप्रधानांनी विरोधी पक्षांनाही मतभेद बाजूला ठेवून देशाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.