जाहिरात

Pune Bridge collapses: कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कसा कोसळला? कारण आलं समोर

या पुलावरून रहदारी करू नये अशी सुचनाही तिथे लिहीली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

Pune Bridge collapses: कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कसा कोसळला? कारण आलं समोर
पुणे:

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. इथं एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी एक लोखंडी पूल आहे. हा पुल अतिशय जुना होता. हाच पुल कोसळला आहे. ज्या वेळी हा पुल कोसळला त्यावेळी पुलावर 50 पेक्षा जास्त पर्यटक उपस्थित होते पाऊस झाल्याने इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात प्रवाह होता. त्याच वेळी हा पुल कोसळला. प्राथमिक माहिती नुसार सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण वाहून गेले आहेत. दरम्यान हा पुल नक्की कशामुळे कोसळला याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा पुल अत्यंत जुना आहे. हा पुल खरा तर वाहतूकीसाठी बंद होता. अशा स्थितीत एक दुचाकी या पुलावरून घेवून जाण्यात येत होती. त्यावेळी पुलावर अनेक पर्यटक उपस्थित होते. दुचाकी पुलावर आल्याने अचानक वजन वाढले. वजन वाढल्याने पुल कोसळला. त्यात वीस ते पंचवीस जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे. तर सहा जण दगावले असल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली आहे. मात्र दुचाकी त्या मोडकळीस आलेल्या पुलावर नेल्याने तो कोसळल्याचे सांगितले जात आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - BIG NEWS: इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती, बचाव कार्य सुरू

या पुलावरून रहदारी करू नये अशी सुचनाही तिथे लिहीली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शिवाय दुकाचीही नेण्यात आली. तिथेच घात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं आहे. किती जण दगावले आहेत हे आताच सांगता येणार नाही. पण बचाव कार्य सुरू आहे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढणं आणि त्यांना मदत करणं ही आपली प्राथमिक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Rashmi Thackeray: ठाकरे गटाच्या कारभारात रश्मी ठाकरेंची ढवळाढवळ? गोगावलेंच्या आरोपानं ठाकरे सेना घायाळ

 दरम्यान एनडीआरएफची पथक बचावासाठी दाखल झाले आहेत. आतापर्यंत 12 जखमींना तळेगावला पाठवण्यात आलं आहे. स्थानिक ही मदत कार्यात पुढे सरसावले आहेत असं मावळच्या पोलिस निरिक्षकांनी स्पष्ट केलं आहे. ज्यावेळी पुल कोसळला त्यावेळी पुलावर 50 ते 60 जण होते असं ही त्यांनी सांगितलं.  एनडीआरएफची टीम आणली आहे. 10 ते 12 रुग्णवाहीका घटनास्थळी आहेत. दरम्यान काही जण वाहून गेले आहेत. प्रशासन दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी

कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात, तळेगाव दाभाडे शहराजवळील एका प्रसिद्ध पर्यटनस्थळावर आहे. हा पूल जूना आणि पादचारी वापरासाठी बांधलेला होता, जो कुंडमळा या पर्यटनस्थळाला जोडतो. कुंडमळा हे ठिकाण विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे, कारण येथील धबधबे आणि इंद्रायणी नदीचे सौंदर्य आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र, हा पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे सांगितले जाते आणि त्याची डागडुजी काही काळापूर्वी झाली होती.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com