भारतीय क्रिकेट संघात रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा या फिरकी जोडगोळीने एक प्रदीर्घ काळ आपल्या गोलंदाजीने समोरच्या फलंदाजाची भंबेरी उडवली आहे. रविचंद्रन आश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही जाडेजा मात्र अद्याप मैदानात कायम आहे. आगामी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जाडेजा भारतीय संघाकडून खेळताना दिसेल. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलवरील पॉडकास्ट सिरीजमध्ये आश्विनने रविंद्र जाडेजाला अनेक विषयांवर बोलतं केलं.
या गप्पांदरम्यान रविंद्र जाडेजाला सर या नावाने कोणी बोलवायला सुरुवात केली...आणि जाडेजाने आश्विनला भर मैदानात शिव्या का दिल्या याबद्दलचा एक मजेशीर किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फिरकीच्या दोन जादुगारांमध्ये अशा रंगल्या गप्पा...
Kutti Stories with Ash या आपल्या पॉडकास्टमध्ये आश्विनने जाडेजाला प्रश्न विचारताना म्हटलं, "आपण दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होतो. 2013 साली ती तुझी पहिली पूर्ण मालिका होती. तु बॉलिंग करत असताना मी कव्हर्समध्ये फिल्डींगला उभा होतो आणि मी तुला उद्देशून म्हणालो, Come on, Sir! तेव्हा तु मला पुन्हा असं बोलू नकोस असं सांगून शिवी दिली होतीस. मला सांग तुला हे सर जाडेजा नाव कोणी दिली आणि तुला राग का आला होता?"
हे ही वाचा - Rohit Sharma : रोहित शर्माची खास विनंती मान्य, बीसीसीआयकडून जुन्या सदस्याचा टीम इंडियात समावेश!
आश्विनच्या या प्रश्नावर उत्तर देताना जाडेजाने स्पष्टीकरण दिलं. "जर कोणीही मला सर म्हणून हाक मारली तर मला वाटतं की तो माझी मस्करी करतोय. हे नाव आता आता माझ्या डोक्यात बसलं आहे. म्हणून मला राग यायचा."
धोनीमुळे मिळालं जाडेजाला सर हे नाव...
याच पॉडकास्टमध्ये बोलत असताना जाडेजाने आपल्याला सर हे नावं कसं पडलं यामागची कहाणी सांगितली. "चंदीगढमध्ये एका सामन्याआधी बाहेरचं वातावरण पाहून मी धोनीला विचारलं की आज प्रॅक्टीसला जावंच लागेल का ?त्यानंतर ट्विटमध्ये त्याने सर म्हणण्यास सुरूवात केली त्यानंतर हे फेमस झालं.
हे ही वाचा - रोहित आणि विराटनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय कधी घेतला? BCCI नं सांगितलं रहस्य
रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा हे दोन्ही फिरकीपटू यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा हिस्सा होते. परंतु दुर्दैवाने यंदाच्या हंगामाच चेन्नईच्या संघाला सूर गवसला नाही, ज्यामुळे ते प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर गेले.
हे ही वाचा - रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर आणखी एका दिग्गजानं केला टेस्ट क्रिकेटला अलविदा