
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक असे सुपरस्टार होऊन गेले आहेत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. तर काही असे स्टार आहेत, जे शिखरावर पोहोचल्यानंतर पुन्हा खाली कोसळले. काहींकडे तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणी उपचारासाठी पैसेही नव्हते. अनेक जण रातोरात स्टार झाले. पण आपले यश सांभाळू शकले नाहीत. पाहता पाहता रस्त्यावर आले. याच अभिनेत्यांपैकी एक होते 1940 -50 च्या दशकात आपल्या अभिनयाने लोकांना हसवणारे अभिनेते भगवान दादा. त्यांना बॉलिवूडचे भगवान म्हटले जात होते. भगवान दादा हे चित्रपटसृष्टीतील असे अभिनेते होते, जे रातोरात स्टार झाले आणि नंतर पाहता पाहता कंगाल झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्या काळात लोकांकडे चित्रपट पाहण्यासाठी टीव्ही नव्हते, त्या काळात भगवानदादांकडे 25 खोल्यांचा बंगला होता. ऐवढेच काय तर त्यांच्याकडे सात आलिशान गाड्या होत्या. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला होता. त्यांचे वडील एका कपड्याच्या कारखान्यात मजूर म्हणून काम करत होते. स्वतः भगवान दादांनीही वडिलांसोबत याच कारखान्यात मजुरी केली होती. वडीलां बरोबर त्यांनी हे काम केलं.
त्यांचे स्वप्न अभिनेता बनण्याचे होते. त्यांनी 'क्रिमिनल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेते म्हणून त्यांनी आपली छाप पाडली. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक ही केले. काही चित्रपटांचे ते निर्माते ही होते. त्यांनी 1951 मध्ये आलेल्या 'अलबेला' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ते स्वतः त्या चित्रपटात होते. त्यांनी तमिळ भाषेतही चित्रपट बनवले होते. त्यावेळी ते यशाच्या शिखरावरही होते.
चित्रपटांमध्ये यशस्वी झाल्यानंतर भगवान दादांवर पैशांचा वर्षाव होऊ लागला. सर्वात आधी त्यांनी मुंबईत 25 खोल्यांचा एक आलिशान बंगला विकत घेतला. नंतर आलिशान गाड्यांचा ढिग लावला. किशोर कुमारसोबतचा 'हसते रहना' चित्रपट मध्येच बंद पडल्यामुळे त्यांना आपली काही मालमत्ता विकावी लागली. मग हळूहळू ते कर्जात बुडत गेले. मृत्यूपूर्वी त्यांची सर्व मालमत्ता हातून गेली होती. त्यांचा मृत्यू 2002 मध्ये 88 व्या वर्षी एका चाळीत झाला. त्यांच्या हिट चित्रपटांमध्ये 'जादुई कालीन', 'भागम भाग' आणि 'छैला बाबू' यांचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world