
आता पाकिस्तान काय करेल? तो भारताच्या एअर स्ट्राईकचा बदला घेईल का? जर घेईल तर कसा? कट्टरपंथी पाकिस्तानला भडकवत असताना, पाक असे धाडस करेल का? भारतीय सैन्याने 100 किलोमीटर आत घुसून पाकिस्तानला पहलगाम हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानची अवस्था आता अशी झाली आहे की, ना त्याला ओरडता येत आहे, ना काही करता येत आहे. त्यात भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर कोणत्याही मोठ्या देशाने पाकिस्तानला साथ दिली नाही. खरं तर, भारताने पाकिस्तानला असा जोरदार झटका दिला आहे की तो पूर्ण पणे गोंधळला आहे. आपली निराशा व्यक्त करण्यासाठी त्याने भारतावर हल्ला करायचा तर कुठे करायचा? जर त्याने सैन्य किंवा नागरी ठिकाणांना लक्ष्य करण्याचे धाडस केले, तर जनरल मुनीर यांना त्याचे परिणाम काय होतील हे चांगले ठाऊक आहे. त्यामुळे अशा स्थितीत पाकिस्तान काय करू शकतो अशा 5 गोष्टी समोर आल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सीमेवर गोळीबार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानकडून सीमेपलीकडून गोळीबार सुरू आहे. दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. भारतीय सुरक्षा दलही त्याला रोज प्रत्युत्तर देत आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानकडून गोळीबार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या गोळीबारातून पाकिस्तान आपली निराशा व्यक्त करेल. बुधवारी एअर स्ट्राईकनंतर जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये एलओसीजवळच्या भागात रात्री उशिरा जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात 10 सामान्य नागरिक मारले गेल्याची बातमी आहे. पाकिस्तान या कृत्यातून आपल्या लोकांना हा संदेश देईल की आम्ही भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहोत.
ट्रेंडिंग बातमी - भारताच्या Operation Sindoor नंतर पाकिस्तानात काय चाललंय? 'या' 10 गोष्टी आल्या समोर
सुरक्षा परिषदेत धाव
काही तज्ञांचे मत आहे की पाकिस्तान पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत हा मुद्दा घेऊन जाऊ शकतो. एनडीटीव्हीशी बोलताना निवृत्त एअर मार्शल सुरेश ग्रेवाल म्हणाले, "पाकिस्तान सुरक्षा परिषदेतही जाऊ शकतो. चीन तेथे त्याची साथ देईल." सुरेश ग्रेवाल यांनी असेही म्हटले की पाकिस्तान काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. आपली पत वाचवण्यासाठी काहीतरी हालचाल करू शकतो. यूएनमध्ये हा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले दुःख सांगायला सुरुवात करेल. मात्र, यूएनमध्ये पाकिस्तानला कोणाची साथ मिळते हे पाहणे महत्त्वाचे असेल. कारण 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कोणत्याही मोठ्या देशाने पाकिस्तानला उघडपणे साथ दिली नाही.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकतो?
'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकतो का? खरं तर, पाकिस्तानमधील काही कट्टरपंथी यासाठी उकसवत आहेत. पण तज्ञांचे म्हणणे आहे की पाकिस्तान ही चूक करणार नाही. कारण त्याला त्याचे परिणाम काय होतील याची चांगली कल्पना आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये फक्त दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानच्या सामान्य जनतेला कोणतीही हानी पोहोचू दिली नाही. जर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची योजना आखली, तर मोठा प्रश्न हा असेल की तो भारतात कोणाला लक्ष्य करेल. भारतात दहशतवाद्यांचे ठिकाण तर नाही. अशा परिस्थितीत जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, तर तो सैन्य ठिकाणांना लक्ष्य करू शकतो. यामुळे थेट युद्धाला सुरुवात होईल.
शांतपणे संधीची वाट पाहणे
काही तज्ञांचे असेही म्हणणे आहे की पाकिस्तान सध्या शांत रहाणे पसतं करेल. कारण भारताशी थेट भिडण्याची त्याच्यात ताकद नाही. कोणतेही ठोस कारण नाही. भारताचे म्हणणे आहे की आम्ही दहशतवाद्यांना लक्ष्य केले, जे जगभरात दहशतीला प्रोत्साहन देतात. जर पाकिस्तानने भारतावर प्रत्युत्तर देण्याचा विचार केला, तर त्याला संपूर्ण जगासमोर अपमानित व्हावे लागेल. मग त्याला अमेरिकेसारख्या देशांकडून मिळणारे सहकार्यही गमवावे लागू शकते. अशा परिस्थितीत तो सध्या शांतपणे वेळेची वाट पाहील.
पाकिस्तान दहशतवाद संपवेल?
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर केलेल्या भारतीय हल्ल्यात 70 ते 100 दहशतवादी मारले गेल्याची बातमी आहे. तथापि, पाकिस्तानी सैन्याचे म्हणणे आहे की, "सहा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शस्त्रांनी 24 हल्ले झाले. ज्यात 26 पाकिस्तानी मारले गेले आणि 46 जखमी झाले." यावरून स्पष्ट होते की पाकिस्तान मारल्या गेलेल्या लोकांना दहशतवादी मानत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world