
मुंबई: 'उद्धव ठाकरेंचा पक्ष आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्यासोबत कोण राहील कोण राहणार नाही? हे येत्या काही दिवसात समजेल असे म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली होती. संजय राऊतांच्या बडबडीला लोक कंटाळले आहेत..' असेही ते म्हणाले. गिरीश महाजन यांच्या या टिकेला आता संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'हातात पोलीस आहेत, पैसे आहेत त्या ताकदीवर लोकांना पैसे देऊन पक्ष फोडायचे. त्यासाठी भाजपने नेमलेले जे दलाल आहेत. त्यामधील एक म्हणजे गिरीश महाजन. उद्धव ठाकरेंचे सरकार असताना यांच्या आर्थिक भानगडींच्या चौकशी सुरु होत्या, तेव्हा हेच मी राजकारणापासून बाहेर पडतो, शांत राहतो असे निरोप पाठवत होते. हे डरपोक लोक आहेत,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
गिरीश महाजन बोलत आहेत हीच भाषा त्यांना घेऊन बुडणार आहे. आत्तापर्यंत अनेकांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. अमित शहांनी तर शिवसेना संपवण्यासाठी जंग जंग पछाडले होते, त्यांना महाराष्ट्र संपवायचा आहे. त्यातलेच हे गिरीश महाजन हस्तक आहेत. गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही..,' असा इशाराही संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी ट्वीट करतही गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन यांचे स्वतःचे कर्तृत्व काय? दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष सुजवायचा, भ्रष्टाचारी देशद्रोही आपल्या पक्षात घेऊन आम्हीच मोठे अशी वल्गना करायची, हा माणूस पैसा आणि पोलिसांच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करायला निघालाय.. अशा शब्दात राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world