राहुल कुलकर्णी, पुणे
Ahilyanagar News: बिबट्यांच्या हल्ल्याच्या धास्तीने अहिल्यानगरमधील काही भागातल्या शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर पुण्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलली आहे.
- सकाळची वेळ: पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी 10 वाजता सुरू होतील आणि 5.30 वाजता सुटतील.
- दुपारची वेळ: माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सकाळी 10.30 वाजता सुरू होऊन 5.30 वाजता बंद होतील.
बिबट्याचे हल्ले प्रामुख्याने पहाटे आणि सायंकाळच्या वेळी होत असल्याने, परिसरातील शाळांच्या वेळेत तात्काळ बअहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) संबंधित शाळांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून सुरक्षिततेच्या नियमांची माहिती द्यावी.दल करण्यात आले आहेत. हा बदल तातडीने लागू करण्यात आला असून, यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी पुरेसा प्रकाश उपलब्ध होईल.
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
शालेय परिसराच्या आसपास असलेल्या उसाच्या शेतांची आणि कड्यांची (टेकड्या) नियमित पाहणी करावी. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या हल्ल्यांच्या ठिकाणी ट्रॅप पिंजरे (सापळे) त्वरित बसवावेत.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेगावकर यांच्या मते, बिबट्याचे हल्ले बहुतेकदा उसाच्या शेतातून होतात, ज्यामुळे ते लपून बसण्यास सुरक्षित ठिकाण बनते. या उपाययोजनांमुळे बिबट्या आणि मानवामधील संघर्ष कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world