जाहिरात

Dharavi Redevelopment: धारावीचा पुनर्विकास गायकवाड कुटुंबियांमुळे रखडला, माजी काँग्रेस नेत्याचा मोठा आरोप

गेली अनेक वर्ष धारावी तशीच आहे. गायकवाड कुटुंबाची सत्ता धारावीवर गेले अनेक वर्ष आहे.

Dharavi Redevelopment: धारावीचा पुनर्विकास गायकवाड कुटुंबियांमुळे रखडला, माजी काँग्रेस नेत्याचा मोठा आरोप
मुंबई:

महाराष्ट्र सध्या विकासाच्या मार्गावर आहे. त्यात मुंबईत एक सर्वात मोठा विकास प्रकल्प आणि ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे धारावी पुनर्वीकास प्रकल्प. धारावी पुनर्विकसाचा मुद्दा सध्या राज्यात एक चर्चेचा विषय बनला आहे. त्यात राज्य सरकारवर विरोधकांकडून ताशेरे ओढले जात आहेत. परंतु धारावीचा विकास हा जाणूनबुजून गायकवाड कुटुंबियांकडून रखडवला जात असल्याचा थेट आरोप केला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धारावी विधानसभा मतदार संघाचे नेतृ्त्व अनेक वर्ष काँग्रेसचा आमदार करत आहे. त्यातही गायकवाड कुटुंबीय यांचीच सत्ता या मतदार संघावर राहीली आहे. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. पण आता या झोपडपट्टीचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. त्यातून त्याचा पुनर्विकस केला जात आहे. पण यावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या आधी धारावीचा पुनर्विकास का केला नाही असा सवाल  काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या रावी राजा यांनी उपस्थित केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - MNS Rada: चप्पल फेकली, झिंज्या ओढल्या, कानशिलात लगावली, महिलांची 'मनसे' दे दणा दण

गेली अनेक वर्ष धारावी तशीच आहे. गायकवाड कुटुंबाची सत्ता धारावीवर गेले अनेक वर्ष आहे. असं असताना देखील आता जर पुनर्विकास होत असेल. लोकांना चांगली घरं मिळतं असेल तर  यांना का त्रास होतो असा सवाल रावी राजा यांनी उपस्थित केला आहे. सरकार धारावीसाठी काहीतरी करू पाहत आहे. त्यात गायकवाड कुटुंबीयांला त्याचं श्रेय मिळणार नाही. आपल्या साम्राज्याला धक्का लागेल. या भीतीमुळेच या पुनर्विकासाला विरोध केला जातोय असं रावी राजा यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - BJP News: चौकशी आधीच बडगुजरांना क्लिनचिट! दहशतवाद्याशी संबंध भाजपला गंभीर वाटत नाहीत का?

सध्या मुंबईत काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे असं रवी राजा म्हणाले. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड या कुठे बैठका घेता ना दिसत नाहीत. ना त्या कुणाच्या  भेटीगाठी घेताना दिसतात. त्यामुळे मुंबई काँग्रेस मधील नेते संभ्रमात पडले आहेत. काँग्रेस फक्त आता धारावी पुरता मर्यादीत राहिली आहे. वर्षा गायकवाड या धारावीच्या बाहेर पडत नाहीत असा आरोप देखील रवी राजा यांनी केला आहे. धारावीत राहून धारावीचा विकास कधीही या कुटुंबाला करावासा वाटला नाही याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com