Indrayani river bridge collapse | इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंड मळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना घडली त्यावेळी तिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात होते. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक आमदार सुनिल शेळके यांनी पाच ते सहा जण दगावल्याची माहिती दिली आहे. ही घटना घडल्यानंतर बचावकार्य तातडीने सुरू केले आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सहा जण दगावले असल्याचं यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली आहे. ते ही घटनास्थळी थोड्याच वेळात दाखल होणार आहेत.

संबंधित व्हिडीओ