वसई विरार नालासोपारा शहर परिसरात काल आणि रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे.तूरळक पावसात देखील पाणी साचल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी साचत असल्याने जर मोठा, मुसळधार पाऊस झाला तर शहर आणि महानगरपालिका परिसराची काय अवस्था होईल याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वसई विरार शहर महानगरपालिके कडून नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे मात्र प्रत्यक्षात नालेसफाईचे काम थुक पट्टी लावण्याचं असून, नालेसफाई कंत्राटदारांच्या फायद्यासाठी केली जाते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.