जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटी मुळे 500 हेक्टर वरील केळीच्या बागांसह मक्याचे पीक जमीनदोस्त झाले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे केळी व मक्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी हे हवालदिल झाले आहेत. दरम्यान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अनेक जिल्ह्यात अवकाळीमुळे नुकसान झालंय, शासन शेतकऱ्यांना मदत करेल अशी आशा भुजबळांनी व्यक्त केलीय..