दरम्यान काल संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा करार झाला. त्यानंतर आज सकाळपासून जम्मू काश्मीरमध्ये शांतता आहे. सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरु आहेत. जम्मू शहर कुपवाडा, पुंछ, सांबा आणि अखनूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्वत्र शांतता पाहायला मिळते आहे. सध्या तरी या सीमा भागांमध्ये कोणतीही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली नाही.