लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकर मानहानी प्रकरणात एक महत्त्वाचा दावा केला आहे या प्रकरणात तक्रारदार सात्यकी सावरकर यांचा संबंध महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या कुटुंबाशी असल्याचं त्यांनी म्हटलंय संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया. सावरकर आणि गोडसे यांच्यात रक्ताचे नातेसंबंध होते हा दावा केलाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी. लंडनमध्ये एका भाषणात राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्याच्या विरोधात सावरकरांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात खटला दाखल केला. याच खटल्याच्या सुनावणी दरम्यान राहुल गांधींच्या वतीनं कोर्टात हा दावा करण्यात आला.