कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी शेतीच्या नुकसानावरून एक वादग्रस्त विधान केलंय. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय कोकाटे नाशिकमध्ये शेतीच्या बांधावर नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी त्यांनी हे दरम्यान जे सत्य आहेच तेच बोललो असं म्हणत ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.