जाहिरात

मुलीला संपण्याची सुपारी दिली, किलरने आईलाच संपवलं! नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज झालेल्या अलका देवी यांनी सुभाष नावाच्या व्यक्तीला तिची 50 हजार रुपयांना सुपारी दिली होती. मात्र अलका देवी यांना पुसटशीही कल्पना नव्हती की आपण ज्याला मुलीला संपवण्याची सुपारी देत आहोत तोच तिचा प्रियकर आहे. 

मुलीला संपण्याची सुपारी दिली, किलरने आईलाच संपवलं! नेमकं काय घडलं?
Etah Woman Murder Case: Subhash Singh, the hitman has been arrested.

मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे संतापलेल्या आईने अल्पवयीन मुलीला संपवण्याचा कट रचला. यासाठी एका व्यक्तीला सुपारी देखील दिली. मात्र सुपारी घेतलेल्या व्यक्तीने मुलीऐवजी आईलाच संपवलं. एखाद्या सिनेमाची कथा वाटेल अशी घटना उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील जसरथपूर येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज झालेल्या अलका देवी यांनी सुभाष नावाच्या व्यक्तीला तिची 50 हजार रुपयांना सुपारी दिली होती. मात्र अलका देवी यांना पुसटशीही कल्पना नव्हती की आपण ज्याला मुलीला संपवण्याची सुपारी देत आहोत तोच तिचा प्रियकर आहे. 

(नक्की वाचा - तुरुंगात होणाऱ्या रामलीलेत 2 कैदी झाले वानर, सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले अन् परतलेच नाही!)

अलका आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणाने कंटाळल्या आणि नाराज होत्या. काही दिवसांपूर्वी मुलगी गावातील एका मुलासोबत पळून गेली होती. त्यानंतर अलका देवी यांनी तिला आईच्या गावी पाठवलं होतं. मात्र तिथेही ती कुणाशी तरी सतत फोनवर बोलत असते अशी तक्रार अलका यांनी मिळाली होती. तेव्हा त्यांनी मुलीला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुभाषला हत्येसाठी 50,000 रुपये देण्याचे कबुल केले. मात्र सुभाष सोबतच तिच्या मुलीचे प्रेमसंबंध होते हे फारसे माहीत नव्हते.

सुभाषने नव्याने एक कट रचला आणि मुलीला सांगितला. मुलीने देखील आईची हत्या केल्यास लग्न करण्याची ऑफर त्याला दिली. त्यानंतर दोघांनी मिळून कट रचला आणि अलका देवी यांना फसवण्यासाठी हत्येचा बनाव रचला. त्यानंतर अलका यांनी सुभाषला 50 हजार रुपये देण्यास नकार दिला. त्यावेळी सुभाषने अलका यांना आग्रा येथे बोलावले आणि तिच्या मुलीसह तिची भेट घालून दिली.

(नक्की वाचा-  महिला अँकरकडे पाहात झाकीर नाईक म्हणाला की…. विधान ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल)

त्यानंतर तिघे आग्राहून एटाला गेले. तेथून ते अलीगंजच्या आधी उतरले आणि अलकाला नागला चंदन येथे घेऊन गेले जिथे तिची हत्या झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
पुणे बोपदेव प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी कसं शोधलं? आधुनिक तंत्रज्ञान कसं फायद्याचं ठरलं? 
मुलीला संपण्याची सुपारी दिली, किलरने आईलाच संपवलं! नेमकं काय घडलं?
controversial muslim preacher zakir-naik-statement-on-female-anchor-viral-video
Next Article
महिला अँकरकडे पाहात झाकीर नाईक म्हणाला की…. विधान ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल