जाहिरात

काँग्रेसला राज्यात मोठा धक्का, माजी मंत्र्यानं केली बंडखोरी, वंचितकडून निवडणूक लढवणार

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्याचवेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसला राज्यात मोठा धक्का, माजी मंत्र्यानं केली बंडखोरी, वंचितकडून निवडणूक लढवणार
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास आता काही तासांचा अवधी उरला आहे. संपूर्ण राज्यात अर्ज भरण्यासाठी मोठी लगबग सुरु आहे. त्याचवेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी तिकीट न मिळाल्यानं पक्षाचा राजीनामा दिला आहे. अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय. ते आता 'वंचित'कडून मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काँग्रेसला फटका

अनिस अहमद यांनी यापार्वी सलग तीन वेळा मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ते यंदाही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आग्रही होते. पण, काँग्रेस पक्षानं मागील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बंटी शेळके यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज होत अहमद यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

विदर्भातील काँग्रेसचा मुख्य मुस्लीम चेहरा अशी अहमद यांची ओळख होती. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून देखील ते प्रसिद्ध होते. विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम केलं आहे. 

अहमद यांच्या बंडखोरीचा महाविकास आघाडीला नागपूर मध्य, नागपूर उत्तर, नागपूर दक्षिण आणि कामठी या मतदारसंघात फटका बसू शकतो. या सर्व मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. अहमद यांना यापूर्वी असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मंजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमन (AIMIM) पक्षानं देखील तिकीट ऑफर केल्याची चर्चा होती. 

मोठी बातमी : निवडणूक समितीच्या बैठकीतून राहुल गांधी बाहेर पडले! 'उबाठा'ला सोडलेल्या जागेवरून नाराज

( नक्की वाचा : मोठी बातमी : निवडणूक समितीच्या बैठकीतून राहुल गांधी बाहेर पडले! 'उबाठा'ला सोडलेल्या जागेवरून नाराज )

काँग्रेसवर मुस्लीमांकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप

मुस्लीम समुदायातील 99 टक्के मतं काँग्रेसला मिळतात. पण, त्यानंतरही पक्षाकडून त्यांच्याकडं दुर्लक्ष होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसनं एकाही मुस्लीम उमेदवार दिला नव्हता. विधान परिषदेच्या निवडणुकीतही तीच परिस्थिती होती. संपूर्ण समाजाला प्रतिनिधित्व हवं असल्यानं आपण बंडखोरी करत असल्याची प्रतिक्रिया अहमद यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना व्यक्त केली होती

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: