
गुरुवार 15 जून रोजी अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावणारे विमान उड्डाण केल्याच्या अवघ्या काही तासात कोसळलं. या अपघातात तब्बल 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानांबद्दल प्रवासी भीती व्यक्त करीत आहेत. दरम्यान एअर इंडियाच्या विमानासंबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे.
हाँगकाँगहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. यानंतर विमान तातडीने परतवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक AI315 ने हाँगकाँगहून वेळेवर उड्डाण केलं होतं. परंतु टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच पायलटला सिस्टिममध्ये काही तरी गोंधळ असल्याचं लक्षात आलं. अशा परिस्थितीत विमानाला परतावे लागले आणि विमान हाँगकाँग एअरपोर्टवर सुरक्षितपणे लँड करण्यात आलं. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचीही माहिती आहे. यानंतर विमान तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात आलं.
रविवारी, चेन्नईला जाणारं ब्रिटिश एअरवेजचं बोईंग ड्रीमलाइनर विमान तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणा केल्यानंतर लंडनला परतलं होतं. ब्रिटिश एअरवेजने एका निवेदनात म्हटले आहे की विमान सुरक्षितपणे उतरले आणि क्रू मेंबर्स आणि प्रवासी यांना अत्यंत सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं. ही घटना अहमदाबादमधील एअर इंडियाच्या बोइंग ड्रिमलायनर विमानाचा अपघात झाल्यानंतर झालं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world