
6000 हजार अपघात, 9000 मृत्यू. हा आकडा आहे, बोईंग विमानांच्या अपघातांचा आणि प्रवाशांच्या मृत्यूचा. अहमदाबादमधलं अपघातग्रस्त विमानही बोईंग प्रकारातलंच होतं. गेल्या काही वर्षात बोईंग विमानांच्या अपघातांची संख्या पाहता, हे विमान प्रवासाठी फारसं सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळालं. गुजरातवरून लंडनला निघालेल्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्री मेंबर होते. या अपघातात दोघांचा जीव वाचल्याचं बोललं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहमदाबादमधील अपघातापूर्वीच्या आकडेवारी पाहाता, जगभरातील विमान अपघातांमध्ये 6000 बोईंग विमानांचा समावेश आहे. ज्यापैकी 415 अपघात फारच घातक होते. या अपघातांमध्ये 9000 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जगभरात वापरल्या जाणाऱ्या एकूण प्रवासी विमानांपैकी 4000 हून अधिक विमान बोईंग प्रकारातली आहेत. फक्त भारतामधल्याच दहा सर्वात मोठ्या विमान अपघात पाहिले, तर ही सर्वच विमान बोईंग प्रकारातलीच असल्याचं आढळलं आहे.
12 नोव्हेंबर 1996 हरियाणा
भारतातील सर्वात मोठे 10 विमान अपघात पाहूयात. 12 नोव्हेंबर 1996. हरियाणाच्या चखरी दादरी इथं हवेत दोन विमानांची टक्कर झाली. यापैकी एक विमान होतं सौदी अरेबियाचं आणि दुसरं कझाकिस्तानचं. या अपघातात 349 प्रवाशांचा मृत्यू झाला होता यात 231 भारतीय प्रवासी होते. हा अपघात भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा अपघात होता.
1 जानेवारी 1978 मुंबई
अरबी समुद्रात एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं. मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर हा अपघात घडला होता. विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे अपघात घडल्याचं पुढे स्पष्ट झालं. या विमान दुर्घटनेत 213 प्रवाशांनी आपले प्राण गमावले होते. हा ही एक मोठा अपघात होता.
2 मे 2010 कर्नाटक
कर्नाटकमध्ये विमानतळावर दोन विमानांची टक्कर झाली होती. विमान धावपट्टीवर उतरताना दोन्ही विमानं एकमेकांना धडकली. या अपघातात 158 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
19 ऑक्टोबर 1981 अहमदाबाद
अहमदाबाद विमानतळावर 1981 साली ही भयंकर विमानाचा अपघात घडला होता. खराब हवामानामुळे पायलटशी संपर्क तुटला होता. त्यामुळे हे विमान अपघातग्रस्त झाले होते. या अपघातात 130 प्रवाशांनी जीव गमावला होता.
12 ऑक्टोबर 1976 मुंबई
विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते लगेच कोसळलं होतं. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागली होती. या अपघातात विमानातील 95 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
16 ऑगस्ट 1991 मणिपूर
खराब हवामानामुळे मणिपूरमध्ये विमानाचा अपघात झाला होता. पायलटचा नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला होता. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात जवळपास 69 प्रवाशांनी प्राण गमावले होते.
17 जुलै 2000 पाटणा
पायलटचं विमानावरील नियंत्रण सुटलं होतं. त्यामुळे पाटण्यातील निवासी वसाहतीत हे विमान कोसळलं होतं. या अपघातात विमानातील 55 आणि वसाहतीतील 5 जणांचा मृत्यू झाला होता.
26 एप्रिल 1993 संभाजीनगर
औरंगाबाद विमानतळावर विमान धावपट्टीवर असताना अपघात घडला होता. उड्डाण घेताना विमानाचं चाक एका ट्रकला धडकलं होतं. या दुर्घटनेत 55 प्रवाशांनी प्राण गमावले होते.
7 ऑगस्ट 2020 केरळ
केरळच्या कालिकत विमानतळावर झालेल्या विमान अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले होते. विमान धावपट्टीवर उतरताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत 21 जणांनी प्राण गमावले
12 जून 2025 - अहमदाबाद
म्हणजेच अहमदाबाद विमानतळावरचा आजचा अपघात. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतलं.पण एका मिनिटातच विमानाचा संपर्क तुटला आणि पाचव्या मिनिटाला विमान कोसळलं. या अपघातात 200 पेक्षा जास्त जणांनी आपला जीव गमावला.
हे सर्वच्या सर्व अपघात बोईंग विमानांचेच आहेत. पण बोईंग विमानांचे अपघात जास्त होण्यामागे आणखी एक तर्क लावला जातो. ही विमानं सर्वात किफायतशीर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत बोईंग विमानांची संख्या कैक पटीने जास्त आहे. त्यामुळे इतरांच्या विमानांच्या तुलनेत बोईंग विमानांचे अपघातही जास्त होत असल्याचं सागितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world