
India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारतानं ही घोषणा केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यापूर्वी हे दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.
भारतानं काय सांगितलं?
आज दुपारी 3:35 वाजता पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्सच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) भारतीय डीजीएमओला दूरध्वनी केला. त्यांच्यात या गोष्टीवर सहमती झाली की दोन्ही बाजू भूमीवर, हवेत आणि समुद्रात भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजल्यापासून सर्व प्रकारची गोळीबारी आणि लष्करी कारवाई थांबवतील.
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, "Pakistan's Directors General of Military Operations (DGMO) called Indian DGMO at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air… pic.twitter.com/k3xTTJ9Zxu
— ANI (@ANI) May 10, 2025
आज दोन्ही बाजूंनी याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक 12 मे रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा चर्चा करतील, असं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी जाहीर केलं.
पररराष्ट्रमंत्री काय म्हणाले?
केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील या विषयावर ट्विट करत भारताची बाजू मांडली आहे.
India and Pakistan have today worked out an understanding on stoppage of firing and military action.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 10, 2025
India has consistently maintained a firm and uncompromising stance against terrorism in all its forms and manifestations. It will continue to do so.
'भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक समजूतदारपणा दर्शवला आहे.भारताने नेहमीच सर्व प्रकारच्या आणि स्वरूपातील दहशतवादाविरुद्ध कठोर आणि तडजोड न करणारी भूमिका घेतली आहे. ती यापुढेही कायम राहील,' असं जयशंकर यांनी म्हंटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world