
शुभम बायस्कार, अमरावती
Bacchu Kadu Protest : माजी मंत्री बच्चू कडू विविध मागण्यासाठी मागील सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. बच्चू कडू यांना रुग्णालयात दाखल न केल्यास त्यांच्या जीवाला धोका आहे, असं अमरावतीचे तिवसा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी हसीलदारांना पत्र लिहिले आहे.
अन्नत्याग आंदोलन असल्याने बच्चू कडूंची प्रकृती बिघडत चालली आहे. यातून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. परिणामी उपोषणस्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.
(नक्की वाचा- बच्चू कडूंच्या आंदोलनाचा सातवा दिवस, बावनकुळेंसोबतची चर्चा फिस्कटली; काँग्रेसचा पाठिंबा)

Bacchu kadu
पत्रात काय म्हटलं?
वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी तहसीलदार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, आपणास कळविण्यात येते की, गुरुदेवनगर, मोझरी येथे 8 जूनपासून बच् कडू व इतर यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु असुन आंदोलनातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय, तिवसा व सामान्य रुग्णालय, अमरावती येथील आरोग्य पथकामार्फत केली जात आहे. त्याअनुषंगाने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी औषधोपचार व रुग्णालयीन भरती करणे आवश्यक असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे.
नक्की वाचा - Education City: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी, 5 विदेशी विद्यापीठांना देणार इरादापत्र
बच्चूभाऊ कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याने त्यांना आज सकाळी डॉ. रवि भुषण यांनी वैद्यकीय तपासणीनंतर तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असून औषधोपचार घेणेविषयी सुचवले आहे. परंतु बच्चूभाऊ कडू यांनी रुग्णालयात भरती होऊन उपचार घेण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे वेळीच त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले नाहीतर प्रकृती ढासाळून चिंताजनक होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच उपोषणस्थळी कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी आपण बच्चु कडू यांना सामान्य रुग्णालय, अमरावती येथे आयसीयूमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world