जाहिरात

Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका

अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत व अजितदादांचे हे मोठेच कौशल्य आहे, असे म्हणावे लागेल. 

Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका

मुंबई: फडणवीस सरकारमध्ये नाराजीनाट्यांचा जो तीन पक्षांचा तमाशा सुरू आहे, त्यावरून भविष्यात मंत्रिमंडळातच टोळीयुद्ध भडकू नये म्हणजे झाले, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाने महायुतीवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून महायुतीमध्ये सुरु असलेल्या नाराजीनाट्यावरुन जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे सामना अग्रलेख?

महाराष्ट्रातील फडणवीस, मिंधे, अजितदादा यांच्या महायुती सरकारमध्ये सध्या जोरदार नाराजीनाट्य रंगले आहे. पाशवी बहुमत असलेल्या सरकारमधील या लाथाळ्या, आरोप-प्रत्यारोप व रुसवे-फुगवे पाहून महाराष्ट्राच्या जनतेची फुकटात करमणूक होत आहे. मंत्रिमंडळातील मिंधे मंडळ अर्थखात्यावर म्हणजेच अजित पवारांवर नाराज आहे. 'पैसा' अर्थात 'निधी' हे नाराजीचे मुख्य कारण सांगितले जात आहे. म्हणजे जुन्याच आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. 

शिवसेना फोडताना व महाविकास आघाडीचे सरकार पाडताना मिंधे मंडळाची हीच नाराजी व तक्रार होती आणि ती आजही कायम आहे. नाराजीच्या त्याच मूळव्याधीने मिंध्यांचे मंत्री पुन्हा हैराण झाले आहेत. त्यावेळी मूळ शिवसेनेशी बेइमानी करताना मिंध्यांच्या लोकांनी अजित पवार यांनाच 'व्हिलन' ठरवले होते. मात्र तेच अजित पवार तुरुंगात जाण्याऐवजी मिंध्यांच्या पावलावर पाऊल टाकून सरकारमध्ये आले व अर्थमंत्रीदेखील झाले. मंत्रिमंडळातील सर्व खात्यांच्या नाड्या अर्थखात्याकडे, पर्यायाने अजितदादांकडे आल्या व दादांनी या नाड्या आवळून धरल्याने अनेकांचा जीव कासावीस झाला. 

Bengaluru Stampede : कुणी दबलं, कुणी चिरडलं... RCB विजेतेपदाच्या जल्लोषातील चेंगराचेंगरीचे 5 भयानक Video

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निधीअभावी अस्वस्थ झालेल्या मंत्र्यांच्या नाराजीला तोंड फुटले. 'दादा पैसेच देत नाहीत भाई', असे रडगाणे घेऊन मिंधे गटाच्या मंत्र्यांनी म्हणे नाराजांच्या सरदाराची भेट घेतली. 'सह्याद्री' अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत निधीअभावी त्रस्त झालेल्या मंत्र्यांनी मिंध्यांसमोर अजित पवारांच्या तक्रारींचा पाढा वाचला. "अर्थमंत्री अजितदादा आमच्या खात्याच्या विकासकामांत खोडा घालत आहेत.

महायुती सरकारमधील ही सुंदोपसुंदी, कुरघोड्या व नाराजीनाट्य यांचा जो काही शेवट व्हायचा तो होईल, पण तोवर महाराष्ट्राच्या जनतेला तीन पक्षांचा हा तमाशा नाइलाजाने सहन करावा लागणार आहे.  132 आमदार असलेल्या भाजपला व अमित शहांनी स्थापन केलेल्या मिंधे पक्षालाही अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत व अजितदादांचे हे मोठेच कौशल्य आहे, असे म्हणावे लागेल. 

ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी! ठाकरे गटाचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, पावसाळी अधिवेशनात देणार दणका

वास्तविक महायुतीच्या सरकारमध्ये खुद्द मिंध्यांवरच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू आहे व पुन्हा या नाराजीची बोंब करण्याची सोयही राहिली नाही. त्यामुळे नाराज झाले की, साताऱ्यातील गाव गाठायचे आणि शेतातील स्ट्रॉबेरी मोजायच्या, हा नाराजीवरील अक्सीर तोडगा जसा मिंध्यांनी शोधून काढला तसाच काही तोडगा त्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना दिला असेल तर सांगता येत नाही. फडणवीस सरकारमध्ये नाराजीनाट्यांचा जो तीन पक्षांचा तमाशा सुरू आहे, त्यावरून भविष्यात मंत्रिमंडळातच टोळीयुद्ध भडकू नये म्हणजे झाले!
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com