विधानसभेला नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष समीर भुजबळ यांच्यात लढत झाली होती.मात्र समीर भुजबळ आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सक्रियपणे काम करताना दिसतात. यावर प्रश्न विचारला असता, समीर भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय की,विधानसभा निवडणूकित राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारलाच गेला नाही.एकंदरीतच नांदगाव मध्ये शिवसेनेच्या सुहास कांदेविरोधात समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती दरम्यान हे राष्ट्रवादीचीच चाल होती का ? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.