पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. याचदरम्यान, आता काटकसरीच्या आवाहनावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय. मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेबाबत का बोलत नाहीत?, असं सवाल राज ठाकरेंनी या पत्राद्वारे उपस्थित केले.