
महायुतीमधील भाजपाचे मित्र पक्ष असणारे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांची तडजोड करत उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर महायुतीमधील कुरघोडी अन् नाराजीनाट्य सुरु झाले होते. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नवनवीन मंत्री वेगवेगळ्या वादात आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकताना दिसत आहेत. कोणते आहेत एकनाथ शिंदेचे हे वादग्रस्त शिलेदार? जाणून घ्या सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदेचे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिलेदार
स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एमएसआरटीसी खात्यावर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही मोठे कंत्राट अधिक दराने दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. ज्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर कंत्राट रद्द करण्याची नामुष्की ओढावली. त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्यात एसटी ईबस खरेदी वादाचा विषय झाला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आणखी एक वजनदार मंत्री म्हणजे भरत गोगावले. फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या खात्याला निधीच नाही यावरून तीळ पापड होत होत आहे. त्यातच या खात्यातील क्षमतेपेक्षा अधिक काम दिल्याने आता निधी नाही अशी स्थिती दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीसोबतच्या वादामुळे रायगडचे पालकमंत्रीपदाचे स्वप्न सध्यातरी अपूर्णच आहे.
(नक्की वाचा: Raja Raghuvanshi Murder Case : राजाशी लग्न ठरवलं, सोनमने आईला धमकी दिली; तेव्हाच सांगितला होता प्लॅन)
शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाटही सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सामाजिक न्याय खात्यात निधी नाही यावरून ओरड होत असतानाच मुख्यमंत्र्यांकडून जाहीर रित्या कुठेही निधी वळवला जात नाही अशी भूमिका घेतली गेली त्यातच शिरसाट यांचे संभाजीनगरमधील मुलाचे हॉटेल खरेदी प्रकरण, एमआयडीसीमधील भूखंड विषयांनी वाद वाढत आहे. महत्त्वाचं म्हणजे शिरसाट यांना देण्यात आलेल्या एमआयडीसी भूखंडावरून उद्योग मंत्री उदय सामंत यांची सुद्धा राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे कारण हे खाते सामंत यांच्याकडे येते.
संजय राठोड यांच्याकडे असलेल्या जलसंधारण खात्याची मागील आठवड्यातच 200 वेगवेगळी काम मुख्यमंत्र्यांनी रद्द केली. नियमितपणा नाही आणि भ्रष्टाचाराच्या संशयावरून या खात्यांना स्टे देण्यात आला आहे .त्याच वेळी संजय राठोड यांच्या खात्यात बदलांच्या अधिकाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात अर्थ व्यवहार होत असल्याचा आरोप आता केला जात आहे अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकाच जागेवर एक पद दीर्घकाळ देण्यामध्ये मोठे अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
(नक्की वाचा: सोनमनं 'मंगळ दोष' दूर करण्यासाठी हत्या केली? राजाच्या वडिलांचा गंभीर आरोप, म्हणाले...)
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे हिंदी भाषेचा पर्याय या मुद्द्यावरून आधीच अडचणीत आले आहेत. त्यात शालेय शिक्षण खरेदी या विषयावरून दररोज आरोप होताना दिसतात, तर गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्रालय यांच्याकडे आहे केंद्रीय मंत्रालयाची हर घर पाणी योजना राज्यात योग्य अंमलबजावणी होत नाही म्हणून विरोधकांकडून त्यांच्यावरही आरोप होत आहेत.
Raja Raghuvanshi Case: 'हो मीच राजाला मारलं', सोनम रघुवंशीचा कबुलीनामा, SITसमोर सर्व सांगितलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world